Heavy Rain : राज्यात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक; अनेक भागांना दिलासा, तळकोकणात मुसळधार बरसात
Heavy Rain : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.

Heavy Rain : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर आणि तळकोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. (Heavy Rain)
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. बीड शहरातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सायंकाळच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक भागांना अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. (Heavy Rain)
सोलापूर शहरात तब्बल दीड महिन्यानंतर दमदार पाऊस बरसला. विडी घरकुल, कुंभार वेससह काही सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात यलो अलर्ट जारी असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Heavy Rain)
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला, तर उल्हासनगरमध्ये रिमझिम पाऊस सुरू राहिला. बदलापूरमधील काही सखल भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. (Heavy Rain)
दरम्यान, तळकोकणातील सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावाजवळ तेरेखोल नदीला पूर आला. धोंडवाडी परिसरातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. चौकुळ गावातही रस्त्यांवर पाणी साचले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. (Heavy Rain)
राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खरीप हंगामाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील काही दिवसांच्या पावसाकडे लागल्या आहेत. (Heavy Rain)
Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतशिवार जलमय; भातरोपे कुजण्याच्या मार्गावर






