मल्लापूरम – केरळच्या बऱ्याच भागात अजूनही जोरदार पाऊस पडत असून गेल्या दोन दिवसांत पावसाने अनेक भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
करीपूरजवळ एक घर पडल्याने त्यात दोन बालके दगावली आहेत. हवामान खात्याने मंगळवारीही केरळात मोठा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली होती. पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
ही स्थिती आणखी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे केरळात येत्या 15 तारखेपर्यंत काही ठिकाणी जोराचा ते अतिजोराचा पाऊस पडेल. केरळातील अनेक भागाला आज पहाटे साडेचार वाजल्यापासूनच जोरदार पावसाने झोडपून काढले. त्याचा सामान्य जनजीवनावर काही ठिकाणी विपरीत परिणाम झाला.