पाटणा – स्त्रीच्या कपाळावर जबरदस्तीने सिंदूर लावणे हा हिंदू कायद्यानुसार विवाह नाही. हिंदू विवाह स्वैच्छिक असल्याशिवाय आणि “सप्तपदी’ (वधू-वरांद्वारे पवित्र अग्निभोवती प्रदक्षिणा घालणे) सोबत होत नाही तोपर्यंत वैध नाही,’ पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. बजंत्री आणि न्यायमूर्ती अरुण कुमार झा यांनी 10 वर्षांपूर्वी झालेल्या पकडौआ विवाहाच्या प्रकरणावर सुनावणी करताना हे मत व्यक्त केले. (marriage force of a gun)
नवादा जिल्ह्यातील (Nawad district) एका जवानाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे लग्न अवैध ठरवले. या प्रकरणावर 10 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. त्याचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे. याचिकाकर्ते रविकांत हे लष्करात सिग्नलमन होते. 10 वर्षांपूर्वी लखीसराय येथे बंदुकीच्या धाकावर त्यांचा बळजबरीने विवाह करण्यात आला होता. वधूच्या मागणीवरून त्यांना सिंदूर लावण्याची सक्ती करण्यात आली. सप्तपदीचा मूलभूत विधी पूर्ण झाला हे सिद्ध करण्यात प्रतिवादी वधू अयशस्वी ठरली, असे न्यायालयाने नमूद केले आहे. (Patna High Court)
हा तथाकथित विवाह कायद्याच्या दृष्टीने अवैध आहे. विवाह रद्द करताना न्यायालयाने म्हटले की, हिंदू विवाह कायद्यानुसार वधू-वर पवित्र अग्नीची प्रदक्षिणा होईपर्यंत विवाह पूर्ण मानला जात नाही. सप्तपदी नसेल तर विवाह पूर्ण मानला जात नाही.
मंदिरात गेले; अपहरण करून लग्न लावले
याचिकाकर्ते रविकांत 30 जून 2013 रोजी काकासोबत लखीसराय येथील अशोक धाम मंदिरात गेले होते. त्यादरम्यान काही लोकांनी बंदुकीच्या धाकावर त्यांचे अपहरण केले होते. यानंतर त्यांना त्याच दिवशी आरोपी मुलीच्या भांगेत सिंदूर लावायला लावले. यानंतर रविकांतच्या काकांनी जिल्हा पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना त्यावेळी यश आले नाही. अखेर हे प्रकरण उच्च पोचल्यानंतर तक्रारदाराला न्याय मिळाला आहे.