वडोदरा: भारताच्या महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून पराभव केला.
अव्वल खेळाडू स्मृती मानधना दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकली नाही. मात्र, तरीही सीमा पुनिया आणि जेमिमा रॉड्रिक्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 45.1 षटकांत 164 धावांत संपला. विजयासाठी आवश्यक 165 धावा भारताने 41.4 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत एका सोप्या विजयाची नोंद केली.
पुनियाने नाबाद 75 तर रॉड्रिक्सने 55 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुनिया सामन्याचा मानकरी ठरली. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.