IND vs BAN – भारत आणि बांगलादेश यांच्यात आज ऍडिलेड मैदानावर सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून बांगलादेशने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट आणि राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला पावसामुळे १६ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र बांगलादेशला १६ षटकांत १४५ धावाच करता आल्या.
#INDvsBAN । भारताचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय, सेमीफायनलचं समीकरण ठरलं
दरम्यान, भारताच्या फलंदाजीच्या वेळी दिनेश कार्तिक धावबाद झाला होता. मात्र आता सोशल मीडियावर कार्तिकला धावबाद देण्यावरून पंचांवर टीका केली जात आहे. कार्तिक आजच्या सामन्यात मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असताना, तो यावेळीही अपयशी ठरला. विराट कोहली स्ट्राईक वर असताना कार्तिक आणि त्याच्यात धाव घेताना चूक झाली आणि कार्तिक बाद झाला. यानंतर आता सोशल मीडियावर कार्तिक चुकीच्या पद्धतीने बाद दिला असल्याचे म्हटले जात आहे. कारण समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये स्टॅम्प्सच्या बेल उडाल्या त्या वेळी चेंडू बांगलादेशच्या खेळाडूच्या हातात नव्हता असे दिसत आहे.
याच मुद्द्यावर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिसऱ्या पंचांनी व्यवस्थित चेक न करता निर्णय घेतला. त्यांना कशाची घाई होती, असेही म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रतिक्रियांमध्ये दिनेश कार्तिकला आता तू निवृत्ती घे असाही सल्ला दिला जात आहे.
Here is the video, judge yourself pic.twitter.com/pge5kly4MU
— Advitia Sharma 🇮🇳 (@shantibhoot) November 2, 2022
सामन्यातील ६४ धावांच्या दमदार कामगिरीसाठी विराट कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याचबरोबर त्याने आजच्या सामन्यातून मोठा पराक्रम केला आहे. त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले आहे. विराट कोहली सध्या २५ सामन्यांत १०३२ धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर या यादीत त्याने श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याला मागे टाकले आहे. जयवर्धनेच्या नावावर ३१ सामन्यांत १०१६ धावा आहेत.
It was bowlers hand that hit the stump not the ball. I think #DineshKarthik was not out. Third umpire didn’t spend too much time looking into it. #INDVsBNG
— cricket_for_life (@bannerman165) November 2, 2022
#DineshKarthik was not out
Third Umpire while giving his decision: pic.twitter.com/LAimKcT06C
— Kadak (@kadak_chai_) November 2, 2022
Retweet this if you also think that Dinesh Kartik was wrongly given Run Out.
Ball didn’t displaced bails, Bowler hit his hand on stump when ball wasn’t in his hand.#DineshKarthik #runout #ICCT20WorldCup2022 #IndiavsBangladesh— Advitia Sharma 🇮🇳 (@shantibhoot) November 2, 2022