नवी दिल्ली – तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, केरळ आणि गोव्यासहित गुजरातला तडाखा दिला आहे. या वादळामुळं चार राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या वादळात मुंबईजवळील अरबी समुद्रात बार्ज ३०५ हे जहाज वादळात अडकल्यानंतर भारतीय नौदलाने यातील १८४ कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला. मात्र १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील आपबीती आता समोर आली आहे.
या वादळातून बचावलेल्या अमितकुमार कुशवाह यांना सांगितले की, जेव्हा वादळाचा परिणाम तीव्र झाला, तेव्हा बार्ज जहाज समुद्रात बुडू लागला, तेव्हा त्यांच्याकडे समुद्रात उडी घेण्याशिवाय मार्ग नव्हता. त्यांच्या मते, ते सुमारे 11 तास लाइफ गार्डच्या मदतीने समुद्रात होते, त्यानंतर नौदलाने येऊन त्यांना वाचवले.
#WATCH | A crew member of Barge P305 breaks down while speaking of Indian Navy’s rescue operations. He was rescued by INS Kochi and brought to Mumbai.
A total of 184 people have been rescued so far, search and rescue operations are still going on.#CycloneTauktae pic.twitter.com/7e8JU3zcT5
— ANI (@ANI) May 19, 2021
सोमवारीपासून समुद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी भारतीय नौदलाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नौदलाला आतापर्यंत पी 305 या बार्जवर अडकलेल्या १८४ कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून आतापर्यंत 14 मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहे. हे कर्मचारी कालपासून लाईफगार्डच्या सहाय्याने पाण्यात होते.