सुपे, (वार्ताहर) – सुपे येथील हजरत ख्वाजा शाहा मन्सूर बाबांच्या उरूस यात्रा शनिवार (दि. 25) ते मंगळवार (दि. 28) या कालावधीत रंगणार आहे. ग्रामपंचायतीने या यात्रेची पूर्वतयारी तायरी झाली असून यात्रेसाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
ग्रामपंचायतीने अनेक मुख्य ठिकाणी स्वच्छता केली आहे. ठीकठिकाणी साचलेलं काचर्याची उचलून विल्हेवाट लावण्यात आली आहे. दर्गाहकडे जाणारा रस्ता नुकताच नवीन करण्यात आला आहे. तसेच ओढ्यातील रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता रुंद करण्यात येणार आहे. गावात ठिकाठिकाणी विजेचे ब्लब बसाविण्यात येत आहेत.
अनेक दिवसांपासून बंद असणार्या हायमास्ट दिवे नवीन बसवण्यात आले आहेत. या कालावधीत गावात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच अश्विनी सकट, ग्रामविकास अधिकारी महेंद्र बेंगारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी काळजी घेत आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये जंतुनाशक फवारण्यात आले आहे. रस्त्यांवरील काटेरी फांद्या काढून टाकण्यात आल्या आहेत.