नागपूर – मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली हाेती. जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांना निर्दोष मुक्त करत त्यांची जन्मठेपेची शिक्षाही रद्द करण्यात आली. त्या नंतर गुरूवारी सकाळी साईबाबाची तुरूंगातून सुटका करण्यात आली.
नागपूर खंडपीठाने यूएपीएनुसार नक्षलवादी समुहांशी संबंध असल्याच्या आरोपातून जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांच्या शिक्षेचा निर्णय रद्द ठरवला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मेनेजेस यांनी या हा निर्णय दिला.
जीएन साईबाबा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना २०१४ मध्ये नक्षलवादी गट आणि भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा आणि इतर सहकाऱ्यांना निर्दोष ठरवल्यानंतर सरकारी पक्षाला सुप्रीम कोर्टात दाद मागावी लागेल. याबाबत सरकारी वकिलांकडून शक्यतांवर चर्चा सुरु आहे.