अकोले – यावर्षी सलग सुट्टी जोडून आल्याने पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केल्याने गर्दीचा महापूर आला होता. 10 ते 15 हजार पर्यटकांनी भंडारदरा परिसरत हजेरी लावली.
कळसुबाई गडावर ही गर्दी झाली होती. गडावर जाण्यासाठी मुंबई, पुणेचे पर्यटक आले होते. रंधा परिसरात गर्दी ओसंडून वाहत होती. दि. 15 ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, सानंददरी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमणात पर्यटकांनी गर्दी केली होती.
सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाहतूक नियमात बदल करण्यात आले होते.
साधारण 25 ते 30 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी त्यानात होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसे आदेश दिले. त्यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा- यश रिसोर्ट- शेंडी भंडारदरा धरण – स्पील्वे गेट – भंडारदरा गाव गुहीरे – रंधा मार्गे इच्छित स्थळी मार्ग केला होता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे पो. उपनिरीक्षक जी. एफ. शेख, पो.कॉ विजय फटांगरे, डगळे, अशोक गाडे, येवले सह सर्व पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेऊन होते. तसेच चेक पोस्टवर दारू सापडली तर ओतून देत होते.