– संगीता चौधरी
‘इंडिया’ला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीशकुमार आता बिहारबरोबरच उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येही रॅली काढणार आहेत. जेटीयूच्या या तयारीकडे रणनीती म्हणून पाहिले जात आहे.
‘इंडिया’ आघाडीला आकार देण्यासाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेतलेला असतानाही त्यांना आघाडीत अद्याप मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे नितीशकुमार यांचे राष्ट्रीय स्वप्न साकारण्यासाठी जेडीयूकडून नवीन रणनीती आखली जात आहे. जेडीयूने उत्तर प्रदेश आणि झारखंड या बिहार लगतच्या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या माध्यमातून नितीशकुमार यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करण्याची रणनीती आखली जात आहे. या राज्यात नितीशकुमार लोकसभेसाठी प्रचाराचा बिगुल ङ्गुंकण्याची शक्यता आहे.
नितीशकुमार यांनी आगामी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ हा वाराणसीत ङ्गोडण्याचा संकल्प केला होता. मात्र, झारखंडमध्ये 21 जानेवारी रोजी हजारीबाग येथे सभा होणार असून तेथे नितीशकुमार सभेला मार्गदर्शन करतील. जेडीयूकडून सभेची तयारी केली जात आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात जेडीयूने आखलेली रणनीती ही महत्त्वाची मानली जात आहे. अर्थातच हा उघड उघड नितीश यांंनी काँग्रेसला दिलेला शह आहे. वाराणसीचेच उदाहरण घेतल्यास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा हा भाग मानला जातो आणि ते पिंडरा विधानसभा मतादरसंघातून अनेकदा जिंकूनही आले आहेत.
ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सप आणि काँग्रेसच्या तिकिटावर मैदानातही उतरले होते. अशावेळी जेडीयूने नितीशकुमार यांच्या सभा आयोजित करण्याची योजना आखत काँगे्रसला देखील एक प्रकारे इशारा देण्याची रणनीती आखली होती. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सप आणि काँग्रेस यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात जागेवरून ताळमेळ न बसल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत स्वतंत्र निवडणुका लढवल्या. सपाची ही भूमिका भाजपला मदत करणारी ठरल्याचा आरोप काँग्रेसवासी करत आहेत. अशा वेळी उत्तर प्रदेशात नितीशकुमारांनी हस्तक्षेप केल्यास काँग्रेसपुढील अडचणी वाढणार.
जेडीयूच्या नेत्यांच्या मते, आता तरी काँग्रेसने नितीशकुमार यांचा सल्ला मानला पाहिजे. आघाडीत सामील असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या मते, काँग्रेसने एककल्ली मानसिकतेतून पाच राज्यांत विधानसभा निवडणूक लढवली.
आता त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सल्ला मानायला हवा आणि त्यानुसार वाटचाल करायला हवी. काँग्रेसने विरोधकांच्या आघाडीची दिल्लीत बैठक बोलावली आणि त्यानुसार ती पार पडली. या बैठकीत निमंत्रक नेमण्यावरूनही चर्चा झाली. तसेच जागावाटपावरही मंथन झाले. तत्पूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणूक निकालानंतर 6 डिसेंबर रोजी तातडीने बैठक बोलावली होती. मात्र, जागावाटपावरून काँग्रेसशी संघर्ष करणार्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बैठकीला येण्यास नकार दिला. तसेच नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी यांनी वेगवेगळी कारणे सांगून बैठकीला येण्याचे टाळले. त्यानंतर काँग्रेसने 19 डिसेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली आणि त्या बैठकीला अपेक्षेप्रमाणे नेते हजर झाले. नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित होते. बैठकीची पूर्वसूचना दिली तर त्यानुसार हजर राहणे शक्य होईल, असे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले.
जेडीयूचे नेते अणि बिहार सरकारमधील मंत्री विजय चौधरी यांच्या मते, नितीशकुमार हा इंडिया आघाडीचा विश्वसनीय चेहरा आहे. नितीशकुमार यांच्या प्रयत्नांमुळेच हे पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांना एकजुटीनेच भाजपचा मुकाबला करावा लागेल. त्यामुळे विजय चौधरी यांनी काँग्रेसला प्रादेशिक पक्षांसमवेत लवचिक भूमिका ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ऐक्य न ठेवता निवडणूक लढविल्यास त्याचा सर्वाधिक ङ्गटका काँग्रेसलाच बसणार आहे. त्यामुळे नितीशकुमार हेच आघाडीचा विश्वसनीय चेहरा आहेत, असे त्यांनी सांगितले.
जेडीयूचे सरचिटणीस निखिल मंडल यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, आता ‘इंडिया’ आघाडीने नितीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार चालायला हवे. गेल्या काही काळापासून काँग्रेस पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त राहिली आणि त्यामुळे इंडिया आघाडीच्या पुढे हालचाली होऊ शकल्या नाहीत. या हालचालींना गती देण्याचे काम नितीशकुमारच करू शकतात. तेच या आघाडीची नौका किनार्यावर नेतील असे जेडीयूच्या नेत्यांना वाटते. माजी मंत्री श्रीभगवानसिंह कुशवाह म्हणतात की, तिन्ही राज्यांत भाजपला गरजेपेक्षा अधिक जागा मिळाल्या; परंतु काँग्रेसकडे मतांची टक्केवारी अधिक आहे. आघाडीच्या नेत्यांना प्रचारात आणले असते तर चित्र वेगळे दिसले असते. नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, असा सल्लाही दिला आहे.
यावरून काँग्रेसच्या संभ्रमात टाकणार्या धोरणावर जेडीयूचा विश्वास राहिलेला नाही. तीन राज्यांत झालेल्या काँग्रेसच्या दुरावस्थेनंतर नितीशकुमार आणि त्यांचा पक्ष कोणीही जोखीम घेण्यास तयार नाही. अशा वेळी इंडिया आघाडीने कोणाचा सल्ला ऐकावा असा पेच निर्माण होऊ शकतो. दिल्लीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची शिङ्गारस केली आहे; तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यास पाठिंबा दर्शविला. या दोघांच्या भूमिका जेडीयू नेत्यांच्या अपेक्षांना आणि नितीशकुमारांच्या महत्त्वाकांक्षेला शह देणार्या आहेत.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, नितीशकुमार प्रदीर्घ काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिले असले तरी त्यांना राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता धुसर आहे. कारण त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाविषयी, प्रशासनाविषयी हे बिहारच्या जनतेमध्ये आणि ङ्गार ङ्गार तर हिंदी भाषिक पट्ट्यांत आकर्षण असू शकेल; पण पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे यायचे तर प्रचंड आत्मविश्वासू आणि नवे व्हिजन मांडणारा नेता गरजेचा आहे. नितीशकुमार त्याबाबत अद्याप खूप पिछाडीवर आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षा राजकारणाचा भाग म्हणून योग्य असतीलही; पण त्यांनी वास्तवाचे भानही ठेवायलाच हवे.