निघोज – पारनेर तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त असतो. यावेळी सुद्धा पारनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पाण्याअभावी पिके जाळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील पठार भागात भयानक परिस्थिती तयार झाली आहे. अशीच परीस्थिती राहिली तर मात्र पशुधन धोक्यात येऊ शकते म्हणून प्रशासनाने चारा छावण्या, पाणी टॅंकर सुरू करावे व तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, युवा सेना तालुका प्रमुख अनिल शेटे यांनी तहसीलदार गायत्री सौदाने तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष राजु शेख, शेतकरी संघटना प्रमुख गुलाबराव नवले, शिवबा संघटना तालुका प्रमुख बबनराव तनपुरे, उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी, यश रहाणे, उपतालुका प्रमुख नागेश नरसाळे, शांताराम पाडळे, शुभम नरसाळे, सुशांत नरसाळे, नीलेश दरेकर, मोहन पवार, अनिल सुपेकर आदिनाथ कदम, शाखाप्रमुख जगदीश सोनवणे, बाळासाहेब वाढवणे, अक्षय बोरुडे आदी सहकारी उपस्थित होते.