अकोले – महापुरुषांना जात, धर्म, प्रदेश यामध्ये अडकवून ठेवणे हा महापुरुषांच्या अनुयायांनी महापुरुषांच्या विचारांचा एक प्रकारे केलेला पराभवच असतो, असे प्रतिपादन अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन आरोटे यांनी केले.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी आणि अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. आरोटे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समाजसेवक कै. नारायणराव पिचड यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर होते.
संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, विश्वस्त मधुकर सोनवणे, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य ऍड. आनंदराव नवले, शरदराव देशमुख, प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, उपप्राचार्य डॉ.संजय ताकटे, प्राचार्या मीना नवले, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, डॉ.प्रशांत तांबे, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, प्रा.बाळासाहेब शेटे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त मधुकर सोनवणे, प्रा.रोहिदास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर यांनी मनोगत व्यक्त केले.