नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या आयएनएस विक्रमादित्यच्या दौर्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय किनारपट्टीवरील दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे. कारण शेजारील देश भारताला अस्थिर करण्यासाठी वाईट कृत्य करीत आहे.
‘जगातील प्रत्येक देशाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा असावी. आम्ही कोणतीही भीती (दहशतवादाचा धोका) हलक्यात घेऊ शकत नाही. आपले शेजारील राष्ट्र भारत अस्थिर आणि खराब करण्यासाठी सतत वाईट कृत्य करीत आहे’ पाकिस्तानला इशारा करत आणि दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांबद्दल संरक्षणमंत्र्यांनी असे स्पष्ट केले आहे.
राजनाथ सिंह आयएनएस विक्रमादित्य येथे रात्रभर थांबले आणि यावेळी त्यांनी पाणबुडी, फ्रिगेट्स आणि वाहकांसह विविध लष्करी अभ्यास पाहिले. ते म्हणाले, ‘मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की आपली भारतीय नौदल समुद्री सुरक्षेसाठी येथे ठाम आणि लक्ष देणारी असून मुंबईसारखा हल्ला पुन्हा होऊ देणार नाही.
Spent 24 hours at INS Vikramaditya. This Aircraft Carrier is the ‘Sikandar of Samundar’.
Visiting ‘Vikramaditya’ was one of the most memorable experiences of my life. A Day at Sea has given me a new perspective about the capabilities and power of the @indiannavy.’ pic.twitter.com/n4Y4ffwNqY
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 29, 2019