मुंबई – शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर बंडखोर शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
यासर्व घडामोडीला 15 दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीतून माघार घ्या; प्रकाश आंबेडकरांचे यशवंत सिंन्हांना आवाहन
खासदार संजय राऊत म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असे राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल हे काय सुरु आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
नगर: वकिलांची कार ओढ्यात गेली वाहून; दोघांचा मृत्यू, एक जण मृत्यूच्या दाढेतून बाहेर