Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते त्यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती आजही तरुणांना मार्गदर्शन करते. जीवनाशी संबंधित सर्व विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये सुखी जीवनाचे रहस्य दडलेले आहे.
प्रत्येकजण सहसा उज्ज्वल भविष्यासाठी पैसे कमावतात. पण काही लोक असे आहेत जे खूप प्रयत्न करूनही पैसे जमा करू शकत नाहीत. याचे कारण त्यांच्या वाईट सवयी देखील असू शकतात. चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांना खूप वाईट सवयी असतात त्यांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय अशा लोकांच्या हातात अजिबात पैसा टीकत नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमीच संकटे येतात.
उशीरापर्यंत झोपणारे –
चाणक्यांच्या मते, जे लोक उशिरापर्यंत झोपतात त्यांच्याकडे पैसा अजिबात टिकत नाही. कारण जे लोक उशिरापर्यंत झोपतात त्यांचा जास्त वेळ झोपण्यातच जातो. त्यामुळे त्यांना भविष्यातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आळशी लोक –
काही लोक खूप आळशी असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. चाणक्यांच्या मते, जे लोक आळशी असतात ते कधीही संपत्ती जमा करू शकत नाहीत. असे लोक आळशीपणामुळे आर्थिक लाभाच्या अनेक संधी गमावतात. त्यामुळे त्यांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
वाईट संगतीचे लोक –
एखाद्या व्यक्तीच्या सहवासाचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो. चुकीच्या संगतीतील लोक चुकीच्या मार्गावर चालतात. चाणक्यां नुसार ज्या लोकांची चुकीची संगत असते ते जीवनात चुकीच्या ठिकाणी अडकतात. तसेच हे लोक पैसे चुकीच्या ठिकाणी वापरतात. त्यामुळे अशा लोकांजवळ पैसा कधीच राहत नाही.
जे लोक महिलांचा अपमान करतात –
चाणक्यांच्या मते, जे महिलांचा अपमान करतात त्यांच्याकडे पैसा कधीच थांबत नाही. कारण महिलांचा अपमान केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते आणि ती व्यक्ती गरीब होण्याच्या मार्गावर येऊ शकते. त्यामुळे चुकूनही महिलांचा अपमान करू नका.