Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; ‘हा’ पक्ष शिंदे गटात होणार विलीन, हालचालींना वेग
Maharashtra Politics : हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेमुळे विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय गणित आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाच्या विलीनीकरणानंतर आता वसई-पालघर पट्ट्यातील बहुजन विकास आघाडी (बविआ) देखील शिंदे गटात विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अखेर मौन सोडले आहे.
हितेंद्र ठाकूर आज एकनाथ शिंदे यांची भेट – (Maharashtra Politics)
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ठाकूर यांनी निवडणुकीत आपणच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा केला.
घोडा मैदान समोर – ठाकूर (Maharashtra Politics)
“माझ्यासोबत राष्ट्रवादी, कम्युनिस्ट आणि बविआची मते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही निर्णायक भूमिका बजावणार आहोत,” असे ठाकूर यांनी सांगितले. पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारले असता, “घोडा मैदान समोर आहे, आमची चर्चा सुरू आहे,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; ‘हा’ पक्ष शिंदे गटात होणार विलीन, हालचालींना वेग
स्वतः विधानपरिषदेसाठी उमेदवारीबाबत बोलताना ठाकूर यांनी, “मी आमदार होणार नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, पुत्र आणि विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना त्यांनी, “कोणताही बाप हा मुलाच्या पाठीशी उभा असतो,” असे म्हणत त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. “निवडणुकीत काय होणार, हे पुढे पुढे दिसेल,” असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला.
हेही वाचा – भाजप आमदाराच्या भावाने पहिल्याच दिवशी नेला अर्ज; इच्छुकांमध्ये खळबळ
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक यांनी आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, “मला भेटायला सगळेच येतात. मात्र, कोणी आम्हाला काही देण्यासाठी येत नाही, तर मदत मागण्यासाठीच येतात. मागील राज्यसभा निवडणुकीतही मदत मागण्यासाठी आले होते.”
हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेमुळे विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय गणित आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




