Loksabha 2024 : नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत.आता इंडिया आघाडीतील आणखी एका पक्षाने स्वबळाची नारा दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी श्रीनगरमध्ये त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
नुकतंच नितीश कुमार हे पुन्हा एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. आपच्या केजरीवालांनी देखील पंजाबमध्ये स्वबळाची नारा दिला आहे. अशात आता अब्दुल्ला यांनी देखील स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केल्याने इंडिया आघाडीचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. | Loksabha 2024
काश्मीरमधील निवडणुकांबाबत फारुख अब्दुल्ला म्हणाले की, लवकरच निवडणुका होतील, अशी आशा आहे. जागावाटपाचा प्रश्न असेल तर नॅशनल कॉन्फरन्स स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. यात काही शंका नाही. यावेळी अब्दुल्ला यांनी विविध घडामोडींवर देखील भाष्य केले. | Loksabha 2024
इलेकट्रोरेल बॉंडबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय चांगला असून सरकराने आणि इतर पक्षांनी त्याचा स्वीकार करायला हवा असं देखील ते यावेळी म्हणाले. | Loksabha 2024
#WATCH | Srinagar: On elections in J&K and seat sharing, National Conference Chief Farooq Abdullah says, “I think that elections in both states will be held with the Parliamentary elections. As far as seat sharing is concerned, NC will contest alone and there’s no doubt about… pic.twitter.com/e2pLpX3YVB
— ANI (@ANI) February 15, 2024
शेतकऱ्यांच्या आंदोलनावर फारुख अब्दुल्ला काय म्हणाले?
त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, जेव्हा शेतकऱ्यांची विधेयके मांडण्यात आली तेव्हा विरोधकांनी त्या विधेयकांचे पुनरावलोकन किंवा सुधारणा करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी बहुमताने विधेयके आणली, त्यामुळे 750 शेतकऱ्यांचा जीव गेला. आज पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संसदीय निवडणुका जवळ आल्याने केंद्र काय कारवाई करेल हे आम्हाला माहीत नाही. मात्र ते योग्य निर्णय घेतील आणि भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.