Chhagan Bhujbal देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नुकतेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर अनेक ठिकाणी दिग्गज राजकीय नेत्यांच्या आपल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होत आहे. यातून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहे. भाजपकडून ‘अबकी बार 400 पार’चा नारा देण्यात आला आहे. यातच आता ‘यावेळी एनडीएचा मार्ग सोपा नाही. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो,’ असे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ? Chhagan Bhujbal|
एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जाहीर सभांना ज्याप्रकारे गर्दी होत आहे. त्यावरून त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचे दिसून येते. पण तरी देखील मतदार यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा एक मजबूत सरकार निवडून आणतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढतीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. “माझ्यासाठी तरी हा प्रकार दुःखद होता. एका कुटुंबात वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यानंतर हा जो काही प्रकार होत आहे. तो अनेक लोकांना पटलेला नाही. चूक कुणाची हा भाग वेगळा. पण हे घडलंच नसतं तर चांगलं झाले असते, असे मला वाटतं असल्याचेही ते म्हणाले.
भाजपकडून दिल्या जाणाऱ्या 400 पारचा नारा याबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “संविधान बदलण्यासाठी 400 रुपयांचा नारा दिला जात असल्याचे लोकांना वाटते. कर्नाटकातील एका खासदारानेही राज्यघटना बदलणार असल्याचे म्हटले आहे. पण आमची राज्यघटना इतकी मजबूत आहे की स्वत: डॉ. भीमराव आंबेडकरही ते बदलू शकत नाहीत, असे पंतप्रधान मोदी स्वतः सांगत आहेत. पण हा संदेश अजूनही जनतेला दिला जात आहे. याचा काय परिणाम होईल हे मतपेट्या आणि ईव्हीएम उघडल्यानंतरच कळेल.” Chhagan Bhujbal
नाशिकमधून माघार घेण्याबाबत भुजबळ म्हणाले की, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माझे नाव नाशिकसाठी सुचविले होते. त्याप्रमाणे मी मनाची तयारी केली होती. पण इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र होत नव्हता. त्यामुळे मी माघार घेतली. कारण मी तिकीट मिळावे म्हणून रडत बसणारा नाही,” असेही छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा:
BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर,’मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान पाहिला नाही’