वाघोली, (प्रतिनिधी) – स्व. आण्णासाहेब मगर यांच्या अथक परिश्रम व मेहनतीने उभा राहिलेला कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीसाठी निश्चित पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजप नेते प्रदीप कंद यांनी कारखाना संचालक मंडळाला दिले.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा प्रदीप कंद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कंद यांनी सांगितले की, कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी सभासद बंधू भगिनींना मोठ्या विश्वासाने नवीन संचालकांना साथ दिली.
यानिमित्ताने नवीन संचालकांचा सन्मान करून हवेली तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या प्रपंचाशी निगडीत असलेल्या स्व. आण्णासाहेब मगर यांच्या अथक परिश्रम व मेहनतीने उभा राहिलेला कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीसाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले.
तालुक्यातील सर्व सहकारी व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत यशवंतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून देखील यामध्ये यश आले नसले तरी ही सर्वांनी आपल्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी सर्वपक्षीय मतभेद बाजूला सारुन भविष्यात यशवंत चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे कंद यांनी सांगितले.