पुणे – विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळाल्यास त्यांच्या हातून विविध कलात्मक रचना घडू शकते असे “कागदापासून पिशव्यांची निर्मिती कार्यशाळेबाबात” त्यांनी आपले मत व्यक्त केले. आर. एम. डी. फाउंडेशनद्वारा रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेत इंगर्जी माध्यमाच्या एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध रंगाच्या कागदी बॅगचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत वर्ग शिक्षकही कागदी बॅग बनविण्याचा आनंद घेत होते. विद्यार्थांनी कागदी बॅग बनविल्यानंतर यापुढे घरगुती भाजीपाला किंवा दूध आणण्यासाठी घरीच बॅग बनवू, प्लास्टिक बॅग वापरणार नाही असे सांगितले. यापुढेही अनेक शाळांमध्ये कार्यशाळा मोफत राबविण्यात येईल, अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली.