पुणे – जिल्ह्यातील 23 गावे दरडप्रवण म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या गावांसह दुर्गम ठिकाणी वसलेली गावे, वाड्या-वस्त्यांवर प्रशासनाचा पहारा असणार असणार आहे. यासाठी 23 पथके स्थापन केली असून ही पथके आठवड्यातून दोनदा या गावांना भेटी देणार असून या भागाची पाहणी करणार आहे. तसेच ठराविक तासानंतर गावातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी सातत्याने ग्रामस्थांबरोबर संपर्क साधला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रातांधिकारी यांचे या पथकावर लक्ष असणार आहे. या पथकामध्ये महसुल, पोलिस, बांधकाम विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, आदींचा समावेश असणार आहे. ही पथके आठवड्यातून दोनदा गावांना भेटी देणार आहे. यामध्ये गावातील भौगोलिक परिस्थिती माहिती घेतली जाणार आहे.
घरांना तडे गेले आहेत, जमीन खचली आहे का, इतर काही बदल असतील तर त्यांची माहिती घेऊन त्याचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे दिला जाणार आहे. त्या सर्वांची माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे. त्याचबरोबर आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या गावांत पर्जन्यमापके बसविण्यात आली असून अतिपाऊस होत असताना दर तासाला आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.