पाटणा – बिहारमधील संयुक्त जनता दलाचे (जेडीयु) नेते गुलाम रसूल बलियावी यांनी सशस्त्र दलात मुस्लिमांना 30 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. बलियावी यांनी भाजपवर निशाणा साधला आणि आरोप केला की पक्ष आपले गुन्हे लपवण्यासाठी सैन्याचा वापर करतो.
भाजपने सैनिकांच्या शौर्याचा आणि धैर्याचा फायदा घेतला. भाजपने मतांसाठी सैनिकांच्या रक्ताशी तडजोड केली आहे. त्यांनी आमच्या सैन्याच्या त्याग, शौर्य आणि हौतात्म्याचा फायदा घेतला आहे. पण लष्करावर आमचा विश्वास आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना बलायावी म्हणाले की, सशस्त्र दलात मुस्लिमांना 30 टक्के आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बोलताना बलियावी यांचे वक्तव्य आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, अनेकांना अनेक गोष्टी बोलण्याची सवय असते. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसते. ते काय बोलले ते मी त्यांना नंतर विचारीनच.