हडपसर – आगीमुळे संपूर्ण संसार उघड्यावर आलेल्या वैदूवाडी येथील १२ कुटुंबाला कै. रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल आबा तुपे यांनी मदतीचा हात दिला आहे.
हडपसर-वैदूवाडी-बिराजदारनगर येथे रविवारी ( दि.१७ ) पहाटे तीनच्या दरम्यान येथील पत्राशेडच्या घरांना आग लागली होती. त्यात घरातील अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, कपडे तसेच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य जळून खाक झाले होते. या जळीतग्रस्त १२ कुटुंबांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
याबाबतची माहिती मिळताच कै. रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल आबा तुपे यांनी तातडीने संबंधित जळितग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन संसारोपयोगी असलेली प्रत्येकी २० भांड्यांचा सेट या १२ कुटुंबांना मदत म्हणून देण्यात आला आहे. याबद्दल राहुल आबा तुपे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Pune : महापालिकेचे गणितही ‘खड्ड्यात’
“प्रत्येक गरीब व गरजूला मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत. हे समजल्यावर आपणही काही मदत करावी या सामाजिक जाणिवेतून ही मदत केली आहे”, अशी भावना यावेळी राहुल आबा तुपे यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्हा : मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत