नवी दिल्ली – मागील आठ महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली बहुचर्चित करोना लस आज अखेर देण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवसाची वाट देशातील लोक कित्येक दिवसांपासून पाहात होते. भारतात पहिल्याच दिवशी एकूण १ लाख ९१ हजार १८१ लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्यांपैकी एकावरही लस टोचल्यानंतर साइडइफेक्ट किंवा इतर कोणत्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे भारतासाठी हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे.
या उलट नॉर्वेमध्ये लस घेतलेल्या २३ वृद्धांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे सर्वांनाच चिंता होती. मात्र भारतात लस दिल्यानंतरही सर्वकाही सुरळीत असून अद्याप चिंता वाढवणारी कोणतेही वृत्त आलेले नाही.
Total of 1,91,181 beneficiaries vaccinated for #COVID19 on day 1 of the massive nationwide vaccination drive: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/K8RPTInUXf
— ANI (@ANI) January 16, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त आज देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांना अर्थात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी लोकांना लस देण्याची योजना केंद्राने आखली आहे. कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे.