झोपडपट्टी सुधारणेसाठी शासनाचे प्रयत्न हवेत
पुणे, दि. 15 – झोपडवासीय नागरिकांना जीवनात उभे करण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि शासनाकडून लवकर योजना आखून प्रयत्न आला नाही तर झोपडपट्टीचा प्रश्न शहरांना ग्रासणारा ठरेल, असा इशारा मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू ऍड. शंकरराव खरात यांनी दिला व म्हटले की, ग्रामीण भागातील बारा बलुतेदार वर्ग रोजगाराचे आशेने शहराकडे धाव घेत आहे व असा वर्ग प्रामुख्याने झोपडपट्टीत राहतो त्यांच्या स्थिर व चांगल्या जीवनासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखण्याची जरूरी आहे.
जीनिव्हा शांतता बोलणी सुरू करा
मॉस्को – छोट्या प्रमाणावरील उभयपक्षी बोलणी प. आशियामध्ये दीर्घकाळ शांतता स्थापन करू शकणार नाहीत. जीनिव्हा शांतता बोलणी पुन्हा सुरू करावीत असे ब्रेझनेव्ह म्हणाले. ब्रिटिश पंतप्रधान विल्सन यांना दिलेल्या खान्याच्या वेळी ते बोलत होते.
लोकसभेच्या निवडणुका पुढेही ढकलल्या जातील
नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका सरकार पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचा इशारा जयप्रकाश नारायण यांनी येथे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रचंड सभेत बोलताना दिला. जयप्रकाश पुढे म्हणाले, देशात चालू असलेली आणीबाणी लक्षात घेता ही शक्यता नाकारता येणार नाही.
कॉंग्रेसमधील नेत्यांची एकमेकांवर टीका नको
नवी दिल्ली – पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या की, शिस्त व ऐक्य या दोन गोष्टींना पक्ष कार्यकर्त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. कारण जनसंघ व भालोदवाले जयप्रकाशांच्या व्यक्तिमत्त्वाचा फायदा उठवून कॉंग्रेसला खच्ची करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. कॉंग्रेसमधील नेत्यांची एकमेकांवर टीका खेदजनक असून त्यामुळे कॉंग्रेसमधील वातावरण दूषित होते.