जम्मू-काश्मीरचा प्रश्न प्रथम सोडवा
पेकिंग, दि. 30 – पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या मागणीस पाठिंबा दिला आणि जम्मू-काश्मीरचा प्रश्न प्रथम सोडविला पाहिजे, भारत-पाक यांचे संबंध पूर्ववत होण्यासाठी ती अट आहे, अशी घोषणा केली. राजनैतिक संबंधातून प्रगतीवरून शांततामय सहजीवन जगण्याची आमची इच्छा आहे. परंतु जम्मू-काश्मीर प्रश्न सुटला तरच हे केवळ शक्य आहे.
कष्टानेच गरिबी व अज्ञान दूर होईल
पुणे – आपल्या देशात गरिबी घालविण्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. कर्जमुक्ती, बेघरांसाठी घरे देणे, भूमिहिनांना जमिनी देणे आणि रोजगारांना रोजगार हमी देणे आदी विविध कामे चालली आहेत. समाजातील गरिबी आणि अज्ञान नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. गरिबांनी कष्ट करण्याची व अज्ञान घालविण्यासाठी मुलांना शिकविण्याची ईर्ष्या बाळगली पाहिजे, असे रत्नाप्पा कुंभार म्हणाले.