नवी दिल्ली – भंडाऱ्याच्या पवनी येथील गोशाळेत चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पवनी पोलिसांनी गोशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतले आहे. गोशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गोशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हते. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
दरम्यान, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील धानोरी या गावात असलेल्या बळीराम गोशाळेत ठेवण्यात आले होते. मात्र, यातील 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.