चिंबळी, (वार्ताहर) – ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ महाराज यात्रेत जमा होणार्या रकमेतून खर्च वजा जाता शिल्लक रकमेचा दरवर्षी यात्रा कमिटीच्या वतीने लिलाव करण्यात येतो. या लिलावाला लाखोंच्या बोली लागतात. यंदा 29 लाखाला तब्बल 47 लाख 39 हजारांची एकूण बोली लागल्याचे दिसून आले.
यात्रा कमिटी खजिनदार माजी उपसरपंच विश्वास बर्गे म्हणाले की, 29 लाख रुपये रकमेचा 15 टप्यांत पार पडलेल्या लिलावात सार्वधिक मोठा 7 लाख रुपयांचा लिलाव माजी उपसरपंच शिवाजी शरद कड यांनी तब्बल 12 लाख 75 हजार रुपयांना तर 5 लाखांचा लिलाव बाजार समिती माजी सभापती विलास कातोरे यांनी तब्बल 8 लाख 57 हजारांची तर 3 लाखांचा लिलाव 5 लाख 1 हजार रुपयांना माजी उपसरपंच विश्वास बर्गे यांनी घेतला.
2 लाखांचे चार लिलाव पार पडले. यात 2 लाखाचा लिलाव उद्योजक बाहुबली चव्हाण यांनी 3 लाख 36 हजार, माजी उपसरपंच हेमंत जैद 3 लाख 34 हजार, माजी उपसरपंच शिवाजी कड यांनी 3 लाख 5 हजार, प्रसिद्ध बैलगाडा मालक अमोल बहिरट यांनी 2 लाख 90 हजार रुपयांची बोली लावत मिळविला.
1 लाखाचे चार लिलाव पार पडले यात सोसायटीचे माजी अध्यक्ष माऊली कड यांनी 1 लाख 55 हजार, उद्योजक सुमित जाधव यांनी 1 लाख 44 हजार, उपसरपंच राहुल चव्हाण यांनी 1 लाख 39 हजार, सुरेश जगनाडे यांनी 1 लाख 35 हजार बोली लावत मिळविला.
50 हजारांचे 4 लिलाव करण्यात आले यात माऊली कड यांनी 71 हजार, नवनाथ बटवाल यांनी 66 हजार, यात्रा कमिटी संचालक दीपक पाटोळे यांनी 66 हजार, सुनील बटवाल यांनी 65 हजार बोली लावत मिळविला. यावेळी अध्यक्ष हिरामण जैद, सचिव, तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष शंकर पा.जैद, माजी सरपंच अर्जुन अवघडे, संचालक बाळासाहेब तु.जाधव, अक्षय जगनाडे, दिलीप सातव, प्रदीप बनकर, महेश कड, संतोष पिरंगुटे नेमीनाथ बटवाल व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.