कलम 370 रद्द झाल्याने वकिलांचा जल्लोष
बारामती- जम्मु-कश्मीर राज्याला स्वायत्ता व विशेष अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे कलम 370 रद्द झाल्याचे वृत्त धडकताच बारामती जिल्हा न्यायालयात वकिलांनी एकजल्लोष केला. तर भारत माता की जय, केंद्र शासनाच्या विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण न्यायालय परिसर दुमदुमला होता. तर वकिलांनी पेढे वाटुन शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
कलम 370 मुळे खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या राज्यघटनेचे आज सार्थक झाले असल्याचे मत ऍड. हरीष तावरे, ऍड. नितीन भामे, ऍड. गणेश आळंदीकर, ऍड. राजेंद्र काळे, ऍड. अरविंद गायकवाड, ऍड. संभाजी काटे, ऍड. तुषार ओव्हाळ आदींनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.
कलम 370 रद्द झाल्याने सर्वसामान्य नागरीक जम्मु काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकतो, त्या राज्यात आता भारताचा तिरंगा फडकवला जाणार आहे, तसेच सर्व कायदे त्या राज्याला लागु होणार आहेत, असे मत अनेक वकिलांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ज्ञ ऍड ए. व्ही. प्रभुणे, बारामती वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड.ज्ञानदेव रासकर, उपाध्यक्ष ऍड. कुणाल जाधव, ग्रंथपाल ऍड. मनिष गायकवाड ऍड. शेखर दाते, ऍड. आर. डी. प्रभुणे, ऍड. महेश गावडे, ऍड. महेश आटोळे, ऍड. शामसुंदर पोटरे, ऍड. वसंत गावडे, ऍड. नितीन अवचट, ऍड. हेमंत होळकर, ऍड. प्रशांत निंबाळकर, ऍड. अभिजित खटावकर, ऍड. अजित जगताप, ऍड. अविनाश गायकवाड यांच्यासह सर्व वकील उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव झाला असून तो सरकारला पाठवला जाणार असल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ज्ञानदेव रासकर यांनी सांगितले.