मुंबई – यंदाच्या टी २० विश्वचषकातून भारताचे आव्हान सिमीफायनलमध्ये संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सेमीफायन मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सोशल मीडियासह अनेकांनी टीम इंडियावर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. याबाबतचे अनेक मिम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने देखील टीम इंडियाच्या या पराभवाबाबत भाष्य केलं आहे.
सेमीफायनल मॅचमध्ये भारताने संथ गतीने केलेली बॅटिंग भारताला काहीशी महागात पडली. त्यासोबतच खराब बॉलिंगमुळे इंग्लडने बिनबाद हा सामना सहज जिंकला. भारत हरला यापेक्षा भारत लढला नाही असं म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर टीम इंडियाला सुनावले. गौतम गंभीरने देखील ट्विटरवरून याबाबत एकाच वाक्यात भाष्य केलं आहे. गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ‘तुम्ही त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवता,जे काहीतरी चांगलं करू शकतात.
You only expect from those who can deliver! Chin up boys 🇮🇳🇮🇳🇮🇳
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 10, 2022
गंभीरच्या या ट्विटनंतर अनेकजण संभ्रमात पडले आहेत. गौतमाने भारतीय संघाला टोला लगावत हे ट्विट केले आहे की सहानुभूतीपूर्वक हे चाहत्यांना काही समजलेले नाही अनेकांनी गौतमाला याबाबत विचारले देखील मात्र संभ्रम कायम राहिलाय. विश्वचषकातून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्सचा पाऊस पडल्याचे दिसून आले. कित्येक क्रिकेटप्रेमींनी तर माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला मिस करत असल्याच्या पोस्ट केल्याचे दिसून आले.