Mohammed Kaif Statement : ‘श्रेयस प्लेइंग ११ मध्ये खेळण्याच्या लायक नाही अन्…’, मोहम्मद कैफ यांच कॅप्टन अय्यरबद्दल खळबळजनक वक्तव्य
Mohammed Kaif Statement : भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी श्रेयस अय्यरविरुद्ध आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे.

Mohammed Kaif Statement On Shreyas Iyer Captaincy Sanju Samson Drop : भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी झाली आहे. त्याच्या कप्तानीखाली संघ पाच सामने खेळला असून भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक पराभवानंतर आता इंग्लंड दौऱ्यावरही टीम इंडिया बॅकफूटवर आहे. या दारुण कामगिरीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी श्रेयस अय्यरविरुद्ध आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केले आहे. कैफ यांनी स्पष्ट म्हटले आहे की, श्रेयस अय्यर हा प्रत्येक टी-२० सामन्यात खेळण्यास लायक नाही.
“प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा न मिळवू शकणारे थेट कर्णधार-उपकर्णधार बनले- मोहम्मद कैफ
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना मोहम्मद कैफ यांनी थेट निवडकर्त्यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले. कैफ म्हणाले, “भारतीय संघ व्यवस्थापनाने अशा दोन खेळाडूंना कर्णधार आणि उपकर्णधार बनवले आहे, जे कामगिरीच्या जोरावर प्लेइंग इलेव्हनमध्ये देखील जागा मिळवण्यास पात्र नाहीत. होय, तिलक वर्माबाबत ५०-५० टक्के विचार होऊ शकतो, त्याने काही सामने जिंकवून दिले आहेत हे मी नाकारत नाही. पण सर्वात मोठी अडचण ही आहे की, तुम्ही जेव्हा कोणाला कर्णधार आणि उपकर्णधार बनवता, तेव्हा त्यांना संघातून ड्रॉप करता येत नाही. याच चुकीच्या निर्णयामुळे संजू सॅमसनला संघातून बाहेर बसावे लागले आहे.”
“Captain & Vice-Captain Don’t Deserve a Place in the Playing XI”
🎙️ Mohammad Kaif:
“India took a huge gamble by appointing Shreyas Iyer as captain and Tilak Varma as vice-captain. Once they were handed leadership roles, dropping them became extremely difficult, regardless of…
— Manoj Tiwari (@ManojTiwariIND) July 9, 2026
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नाही –
🚨 KAIF RAISES QUESTIONS OVER INDIA’S SELECTION POLICY🚨
According to Mohd Kaif, leadership decisions should not influence team selection. He suggested that assigning captaincy and vice-captaincy roles can sometimes make it harder to make tough selection calls.
His remarks have… pic.twitter.com/cfxnBzuRui
— Infinite Infos (@infiniteInfos) July 9, 2026
श्रेयस अय्यरच्या थेट कर्णधार बनण्यावर तीव्र आक्षेप घेत कैफ पुढे म्हणाले, “श्रेयस अय्यरची टी-२० संघात अचानक वापसी होते आणि तो थेट संघाचा कर्णधार बनतो, हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आधी कधीही घडलेले नाही. हा निर्णय नक्की कसा आणि कोणी घेतला? संजू सॅमसनसारख्या मॅच विनरला संघातून बाहेर करणे हा खूप मोठा आणि चुकीचा निर्णय होता. श्रेयस जर कर्णधार नसता, तर त्याला पहिल्यांदा संघातून बाहेर केले गेले असते. तुम्ही संघात परत आला आहात ठीक आहे, पण तुमची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागाच बनत नाही. ज्यांनी हे निर्णय घेतले आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे.”
जर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची ही मालिकाही हरला, तर श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचे भवितव्य धोक्यात येईल यात शंका नाही.





