World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia).
या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व विजय खेचून आणला व त्याच क्षणी केवळ मैदानात उपस्थित असलेल्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांची निराशाच झाली. 2003 सालच्या स्पर्धेचीच जणू पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाने केली असेच आता म्हणावले लागेल.
दरम्यान, विश्वचषकाच्या हायहोल्टेज सामन्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. असं राऊत म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, “जिंकला तर भारतीय जनता पक्ष, आणि आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला हरले असले तरी त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे.
अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळ नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. काल आपण वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता.’ असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut)