Union Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी धोरणात्मक आणि अग्रगण्य क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विविध क्षेत्रातील लोकांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. Union Budget 2026: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार? अर्थमंत्र्यांनी सांगितले की, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन अधिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून कृषी क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळू शकेल. त्यानुसार पशूपालन दुग्धव्यवसायासाठीचे अनुदान वाढवणार तसेच काजू, कोको ब्रँड जागतिक दर्जा मिळवून देणार, या उत्पादनांच्या निर्यातीला गती देण्यावर सरकारचा विशेष भर राहील. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल. चंदन हे सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे पीक असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर मत्स्यवसायात महिलांचा सहभाग वाढवणार, ५०० एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार सागरी किनारपट्टी आणि इशान्येकडील शेतकऱ्यांना मदत करणार नारळ उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक असून सुमारे ३ कोटी लोकांचे उपजीविका या क्षेत्रावर अवलंबून आहे. नारळ क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात येत असून, सरकारकडून आवश्यक मदत दिली जाईल. तसेच मुख्य नारळ उत्पादक राज्यांमध्ये विशेष उपक्रम राबवले जातील. हेही वाचा: Amol Mitkari Post : विमान अपघाताविषयी मिटकरींच्या 5 प्रश्नांनी खळबळ! म्हणाले “अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात…”