Uddhav Thackeray : “रामद्रोह म्हणजेच देशद्रोह; अयोध्येत लूट सुरू, आता हिंदू माफ करणार नाही” : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : अयोध्या येथील राम मंदिर देणगी आणि कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Uddhav Thackeray : आपण कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे नक्कीच आहोत, पण मूर्ख नाही. आपल्या याच हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी राम मंदिर लुटत असेल, तर आता हिंदू त्यांना माफ करणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच रामद्रोह म्हणजेच देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले. (Uddhav Thackeray)
अयोध्या मंदिरातील कथित देणगी प्रकरणी रविवारी रामरक्षा आंदोलन करण्यात आले. दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालीसा म्हणत हे आंदोलन करण्यात आले. भरपावसात हजारो शिवसैनिकांसह प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदार, आमदार तसेच हजारो शिवसैनिक उपस्थित होते. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशातील हिंदूंना जागृत करण्याचे ऐतिहासिक काम केले. राम मंदिर आंदोलनासाठी शिवसेनेने दिलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. (Uddhav Thackeray)
त्या कठीण काळात बाळासाहेबांमुळे अनेक हिंदूंचे संरक्षण झाले. गेल्या 12 वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करण्यात आले. पण, शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्वाचा लाभ राजकीयदृष्ट्या घेण्यासाठी शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. (Uddhav Thackeray)
आज आपण ज्यासाठी मेहनत केली होती, ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली. पण, त्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलाखानी विडा उचलला. कारण, त्यांना हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना शिवसैनिक, एकच शिवसेना देशात अशी आहे. (Uddhav Thackeray)
समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारु शकेल. काय वातावरण होते तेव्हा, ‘अयोध्या तो झांकी है, काशी मुथरा बाकी है’ मला आता भीती वाटायला लागली आहे. ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray)
12 वर्षांत आपल्या भगव्याचे सरकार तिकडे आले असताना आपल्याला वाटत होते, अब हिंदू मार नही खायेगा. पण, हिंदूंना लुटणारे सरकार तिथे बसले आहे, हे आपले दुर्भाग्य आहे. पहिली सुरुवात शंकराचार्यांनी केली, केदारनाथातील सोने लुटले गेले. (Uddhav Thackeray)
मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटली गेल्याचे आरोप झाले. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येत एक आयएएस ऑफिसर बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलोचा सोन्याचे मुलामा असलेले रामचरित्रमानस गायब झाले. (Uddhav Thackeray)
नऊ नऊ तास बसवले जाते, पण उत्तर दिले जात नाही. शिवसेनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेले सगळे?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा






