नगर – जिल्ह्यातील 100 गावांत दूषित पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याबाबत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आल्या.
समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आली. सभेस सदस्य रामभाऊ साळवे, सोमीनाथ पाचारणे, नंदाताई गाढे, पंचशीला गिरमकर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह तालुक्यांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.