Uddhav Thackeray | महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. मात्र विधामंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेते पद कोणाकडेही नाही. या मुद्यावरुन अधिवेशनात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. परंतु अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेता पदाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मागील काही दिवसांनपासून महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती. भास्कर जाधव हे अनुभवी नेते असल्याने हे पद त्यांच्याकडे जावे असे म्हंटले जात होते. पण आता भास्कर जाधव यांना बाजूला सारून उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार, अशी माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही म्हंटले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेतेपद आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळू शकतं. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास त्यांना अनुभव मिळेल आणि ते आक्रमकपणे प्रचार करू शकतील, असे म्हंटले जात आहे. Uddhav Thackeray | चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने नाराजी व्यक्त करत मविआने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. ती रिक्त ठेवून सत्ताधारी संविधानावर अविश्वास दाखवत आहेत. त्यामुळेच त्यांनी चहापानाला न जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी रिक्त ठेवण्यात आले आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. Uddhav Thackeray | यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. “विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष महोदयांच्या अख्यातरीत असणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेतेपद का नाही ? विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी 288 जागा असलेल्या विधानसभेत किमान 29 आमदार असणं आवश्यक आहे. परंतु महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यापैकी कोणकडेही स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमांनुसार कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक 10 टक्के संख्याबळ नसल्याने हे पद रिक्त राहिले आहे. सध्या विधानसभेत ठाकरे गट (शिवसेना) 20, काँग्रेस 16, शरद पवार गट (राष्ट्रवादी) 10 इतकी सदस्य संख्या आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 आमदार नसल्याने हे पद रिक्त आहे. Uddhav Thackeray | हेही वाचा: राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड; बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर महत्त्वाचा निर्णय