मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी कॉंग्रेसचे 11 आमदार अनुपस्थित होते. यापैकी 9 आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.
कॉंग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला. कॉंग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.
ममतांनी समज दिल्यानंतरही महुआ मोईत्रा ठाम; म्हणाल्या, ‘अशा भारतात राहण्याची आपली मुळीच…’
संदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे. दरम्यान, कालच कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पक्षाच्या प्रभारींना पत्र लिहून कॉंग्रेसच्या काही आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्यासाठी मतांचा जो कोटा ठरवण्यात आला होता ती मते हंडोरे यांना मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षादेश न पाळणाऱ्या नेत्यांवर कारवाईची मागणी चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, मतफुटीचा हा मुद्दा पक्ष श्रेष्ठींनी गांभीर्याने घेतला असून त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत श्रेष्ठींशी बोलणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सचिन पायलट यांची बेशिस्त खपवून घेणार नाही – काँग्रेस