भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात ( T20 WorldCup 2022 ) सलग दोन सामने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सवर ५६ धावांनी मात केली. पण या दोन्ही सामन्यात संघाचा सलामीवीर केएल राहुलची बॅट एकदमच शांत राहिली. राहुलला दोन सामन्यात केवळ १३ धावा करता आल्या आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ८ चेंडूत ४ धावा आणि नेदरलँडविरुद्ध १२ चेंडूत ९ धावांवरच तो बाद झाला.
ऐकलं का! झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने विराट आणि सूर्यकुमारचाही विक्रम मोडला
याच कारणामुळे संघाला मागील दोन्ही सामन्यात चांगली सुरुवात मिळालेली नाही. त्यामुळे राहुलच्या संघातील सलामीच्या स्थानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुलला संघाबाहेर ठेवा आणि त्याच्या जाग्यावर ऋषभ पंताला सलामीला संधी द्यावी, अशी मागणी चाहत्यांकडून केली जात आहे.
सलामीला खेळताना रेकॉर्डमध्ये केएल राहुलचे पारडे नक्कीच जड असल्याचे दिसून येते. त्याच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये २ शतके आहेत. तर दुसरीकडे ऋषभ पंत हा एक्स फॅक्टर खेळाडू आहे हेदेखील नाकारता येणार नाही. ऋषभची ऑस्ट्रेलियातील कामगिरीही जबरदस्त आहे. परंतु महत्वाचं म्हणजे ऋषभने याठिकाणी कसोटी क्रिकेट जास्त खेळले आहे. त्याचबरोबर त्याची भूमिका ही अनेकवेळा फिनिशरचीच राहिली आहे.
I will take any version of Rishabh Pant over this fraud KL Rahul. pic.twitter.com/xc1otxyesQ
— Sourabh (@1handed6) October 27, 2022
भारतीय संघाचा पुढील तिसरा सामना ३० ऑक्टोबरला साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळला जाणार आहे. भारतीय संघ सध्या गट-२ मध्ये ४ अंकांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे आता भारताला एक सामना जिंकून आपले सेमीफायनलमधील स्थान पक्के करायचे आहे. त्याचबरोबर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ( T20 WorldCup 2022 ) पावसाने अनेक मोठ्या संघांच्या खेळावर पाणी फिरवले आहे. त्यामुळे भारताच्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पावसाच्या आगमनाची शक्यता आहे.
9(12), Strike rate- 75 against mighty Netherlands.
This is KL Rahul’s World, We are just living in it…bow down for the King Rahul 🙇♂️🔥 #INDvNED pic.twitter.com/ysMXw6sysu— TukTuk Academy (@TukTuk_Academy) October 27, 2022
Kl rahul proving his haters wrong by not performing against weak team too 😍😋
— time square 🇮🇳 (@time__square) October 27, 2022