Suryakumar Yadav Controversy : मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या कृतीने क्रिकेट जगतात खळबळ! आधी पोस्ट हटवल्या, मग कॅप्टन अन्ं संघाला केलं अनफॉलो
Suryakumar Yadav Controversy : आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यानंतर पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या स्टार खेळाडूंचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Suryakumar Yadav Controversy Unfollows MI Hardik Pandya : आयपीएल २०२६ चा हंगाम संपल्यानंतर पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि त्यांचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्यातील वादाची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर आधी मुंबई इंडियन्सला ‘अनफॉलो’ करणे, नंतर पुन्हा ‘फॉलो’ करणे आणि या काळात फ्रँचायझीशी संबंधित काही महत्त्वाच्या पोस्ट डिलीट केल्यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे, सूर्या आता मुंबई इंडियन्सला फॉलो करत असला, तरी त्याने संघाचा मुख्य कर्णधार हार्दिक पंड्याला अजूनही फॉलो केलेले नाही.
सूर्याचा पत्ता कट; श्रेयसकडे धुरा! (Suryakumar Yadav Controversy)
नुकतीच सूर्यकुमार यादवकडून भारतीय टी-२० संघाची कप्तानी हिरावून घेण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी २०२८ ऑलिम्पिक आणि आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन श्रेयस अय्यरची दीर्घकालीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. अनेक युवा आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंच्या गर्दीत आता सूर्याची राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची वाट कठीण मानली जात आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज किंवा ट्रेड करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
हार्दिकच्या कप्तानीचा फ्लॉप शो; मुंबई इंडियन्स करणार रिव्ह्यू! (Suryakumar Yadav Controversy )
NEXT LEVEL DRAMA CREATED BY SURYAKUMAR YADAV AND HARDIK PANDYA 😭
–
One day they follow, another day they unfollow and after controversy start following again. 😂 pic.twitter.com/nQWnAbaYGB— Cricket Central (@CricketCentrl) June 8, 2026
मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत लाजिरवाणा ठरला. संघ केवळ सरस नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर राहण्यापासून वाचला. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर फ्रँचायझीमध्ये अंतर्गत आत्ममंथन सुरू झाले आहे. २०२० नंतर मुंबईला एकही आयपीएल (IPL ) खिताब जिंकता आलेला नाही. २०२४ पासून हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालीमुंबईचा विजयाचा दर अवघा ३८ टक्के राहिला असून ३९ सामन्यांपैकी तब्बल २४ सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या हंगामात मुंबई इंडियन्सने अनेक विचित्र निर्णय घेतले. संपूर्ण मोसमात हार्दिक, सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराह अशा तीन वेगवेगळ्या खेळाडूंनी कप्तानी केली, तर तब्बल २४ खेळाडूंना आजमावण्यात आले. आता या अंतर्गत वादावर मुंबईचे व्यवस्थापन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Suryakumar Yadav Controversy)





