Sunil Gavaskar : ‘ते IPL मध्ये करोडो कमवत आहेत, पण त्याच्या लायक नाहीत…’, सुनील गावस्कर कोणावर संतापले?

Sunil Gavaskar Criticizes IPL Focused Uncapped Player : माजी भारतीय कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी अशा अनकॅप्ड खेळाडूंवर टीका केली आहे, ज्यांचे लक्ष फक्त आयपीएलवर आहे. जे कठीण देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळतात. ते म्हणाले की ते भाग्यवान आहेत की ते करोडो कमवत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते त्यास पात्र नाहीत. गावस्कर म्हणाले की, जे खेळाडू सातत्याने देशांतर्गत क्रिकेट खेळतात, त्यांना भारतीय संघात स्थान मिळण्याच्या आशेने प्रोत्साहन आणि पुरस्कार देण्याची गरज आहे.
स्पोर्ट्स स्टारच्या एका स्तंभात, लिटिल मास्टर म्हणाले, ‘यासाठी बाजार जबाबदार आहे. या गोष्टी योग्य नाहीत. आयपीएलमधील करोडपती अनकॅप्ड खेळाडूंवर एक नजर टाका, ज्यामुळे तुम्हाला कळेल की त्यापैकी फार कमी लोकांनी भारतासाठी काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे नशीब आहे की त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले, परंतु प्रत्यक्षात ते त्यास पात्र नाहीत.’
देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणारे खेळाडू –
रसिक दार (आरसीबी), नमन धीर (मुंबई इंडियन्स), नेहल वढेरा (पंजाब किंग्स), अब्दुल समद (एलएसजी), अंशुल कंबोज (सीएसके), प्रियांश आर्य (पंजाब किंग्स), आशुतोष शर्मा (दिल्ली कॅपिटल्स) यांसारख्या काही अनकॅप्ड खेळाडूंनी आयपीएल करोडो रुपयांची कमाई केली आहे. परंतु हे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवतात.
हेही वाचा – IND vs ENG : पतौडी ट्रॉफीला अलविदा! भारत-इंग्लंड कसोटी मालिका आता ‘या’ नावाने ओळखली जाणार
फीसाठी स्लॅब सिस्टीम आणावी – सुनील गावस्कर
गावस्कर म्हणाले की, बीसीसीआय आणि राज्य संघटनांनी असे काहीतरी करावे जेणेकरून रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना फायदा होईल. ते म्हणाले, ‘बीसीसीआयने अलीकडेच मॅच फी वाढवली आहे आणि ती खूप चांगली आहे. पण जर त्यांनी फीसाठी स्लॅब सिस्टीम आणली आणि जे जास्त खेळतात त्यांना जास्त फी मिळाली तर अधिक खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सहभागी होतील.’
हेही वाचा – French Open 2025 : गॉफचा धमाका, सबालेन्काचा दबदबा; दोघींमध्ये रंगणार फायनलचा थरार
सुनील गावस्करांकडून प्रियांक पांचाळचे कौतुक –
सुनील गावस्कर यांनी गुजरातचा माजी कर्णधार प्रियांक पांचाळचे कौतुक केले. त्यांनी जवळजवळ २ दशके रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आणि नुकताच निवृत्तीचा कठीण निर्णय घेतला आहे. तो रणजी ट्रॉफी विजेत्या गुजरात संघाचा भाग होता, पण त्याला कधीही टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही मिळाली नाही.





