Eknath Shinde : अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस, एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Eknath Shinde : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या सर्वात मोठ्या राजकीय भूकंपावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

Eknath Shinde : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी केलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर बोलताना शिंदे यांनी “ऑपरेशन टायगर आता फुलप्रूफ सक्सेस झालं आहे” अशी घोषणा करत नव्या खासदारांच्या सन्मानाची आणि त्यांच्या मतदारसंघांच्या विकासाची हमी दिली. (Eknath Shinde)
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. (Eknath Shinde)
‘खासदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’
नव्या खासदारांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या परिवारात सहा नवीन खासदार सामील झाले आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न असोत किंवा राज्यातील विकासकामे, या खासदारांच्या मतदारसंघातील कोणतेही काम अडवले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (Eknath Shinde)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव
‘शिवसेना आणखी भक्कम होणार’
या प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले, ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर शिवसेना अधिक भक्कम होईल. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. (Eknath Shinde)
प्रत्येक खासदाराचे नाव घेत शिंदेंकडून कौतुक
भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व खासदारांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले. संजय दिना पाटील हे जनतेशी जोडलेले आणि कार्यकर्त्यांचा कैवारी असल्याचे त्यांनी सांगितले. ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करताना, त्यांना काही जणांनी ‘रील स्टार’ म्हटलं, पण ते ‘रिअल स्टार’ आहेत, असे शिंदे म्हणाले. संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाचाही त्यांनी गौरव केला. (Eknath Shinde)
‘विकासासाठीच निर्णय’
हे सर्व खासदार केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेची कामे करण्यासाठी शिवसेनेत आल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, त्यांच्या प्रत्येक मतदारसंघातील विकासकामांना गती दिली जाईल आणि अडचणी तत्काळ सोडवल्या जातील. (Eknath Shinde)
2022 च्या बंडाचा उल्लेख
2022 मधील शिवसेनेतील बंडाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची विचारधारा वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. त्यावेळी आमच्यासोबत आलेले 40 आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असे म्हटले जात होते. पण जनतेने 40 चे 60 आमदार निवडून दिले. (Eknath Shinde)
कार्यकर्त्यांना दिला विश्वास
शेवटी त्यांनी सांगितले की, मी दिलेला शब्द पाळतो. त्यामुळेच लोक आणि कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवतात. आता या सहा खासदारांच्या माध्यमातून शिवसेना आणखी मजबूत होईल आणि विकासाची गती वाढेल. (Eknath Shinde)






