Shreyas Iyer Statement : “१८० धावा होतील वाटत होतं, पण इशान-तिलकने…”, पहिली मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य
Shreyas Iyer Statement : कर्णधार म्हणून पहिली टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने युवा खेळाडूंच्या आक्रमक खेळाचे जोरदार कौतुक केले.

Shreyas Iyer Statement on IND vs ZIM 2nd T20I Series Win Ishan Tilak Praises : भारत आणि जिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने जिम्बाब्वेचा ९० धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी अजेय आघाडी मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २१९ धावांचा डोंगर उभा केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरा दाखल झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १७.५ षटकांत १२९ धावांवर गारद झाला. या दणदणीत विजयानंतर आणि कर्णधार म्हणून पहिली टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) युवा खेळाडूंच्या आक्रमक खेळाचे जोरदार कौतुक केले.
“इशान अन् तिलकची फलंदाजी सोन्याहून पिवळे ठरले!”
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “सुरुवातीला या खेळपट्टीवर १८० ते २०० धावा हा एक उत्तम स्कोअर असेल असा आमचा अंदाज होता. मात्र, इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी ज्या प्रकारे फटकेबाजी केली, ती अप्रतिम होती. त्यांच्या वादळी योगदानामुळे आम्ही २१९ धावांपर्यंत पोहोचलो, जे आमच्यासाठी ‘सोन्याहून पिवळे’ ठरले.” यासोबतच त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून विरोधी संघाला स्वस्तात गुंडाळणाऱ्या गोलंदाजांचीही पाठ थोपटली.
🔴 RAKA-MAKA SHOTS – SHREYAS IYER VIRAL STATEMENT ON TILAK VARMA 🤯
Q 🎙️: What stood out the most for you in today’s performance?
Iyer🎙️: “The way Ishan and Tilak batted was outstanding. Some of the shots Tilak played were absolutely raka-maka. They were a treat to watch and… pic.twitter.com/q78zKRlprE
— Sam (@cricsam02) July 25, 2026
युवा टीमचा ‘फिअरलेस’ अंदाज –
Shreyas Iyer said: “That’s how you’ve got to approach the game. I feel it’s all about the attitude. Not to dwell too much on the previous or past performances. Keep going forward and, more importantly, you need to be in the present. You’ve got to maximise every opportunity you… pic.twitter.com/cjPSmtjLC5
— Cricket Central (@CricketCentrl) July 25, 2026
भारतीय संघाच्या निडर आणि बेधडक खेळाबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच आक्रमक दृष्टिकोनाची गरज असते. खेळाडूंनी भूतकाळातील कामगिरीचा विचार न करता नेहमी वर्तमानात जगले पाहिजे. क्रिकेटमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा उठवणे महत्त्वाचे असून, आगामी सामन्यांमध्येही आमचा संघ याच बेधडक शैलीने मैदानात उतरेल.”
प्रिन्स यादव दुखापतग्रस्त; तिसऱ्या सामन्यात बदलाची शक्यता –
भारताच्या या शानदार विजयादरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव गोलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring) दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर गेला. त्याने १.२ षटकांत १० धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. या दुखापतीमुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात अष्टपैलू अभिषेक शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स (१७ धावांत), तर पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने ३० धावांत २ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.





