Ajit Pawar : मोठं नुकसान झालं, यात कुठेही राजकारण नाही..! अजित दादांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, VIDEO पाहा
"हा निव्वळ अपघात आहे, यात कुठेही राजकारण नाही. अजित पवारांच्या निधानानं राज्याचं मोठं नुकसान झालं आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अजित पवार (१३५९–२०२६) हे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक होते, त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा काम पाहिले. तसेच त्यांनी वित्त आणि नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली.
ते त्यांच्या मजबूत संघटनात्मक कौशल्यांसाठी, निर्णायक नेतृत्वासाठी आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आकार देण्यात बजावलेल्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. दुर्दैवाने २८ जानेवारी २०२६ ला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांच्या कारकिर्दीचा अकाली अंत झाला.
ही बातमी वाचा : Ajit Pawar Death : विमानाचे अखेरचे क्षण…; अनेकदा उतरण्याचा प्रयत्न, गो-अराउंड, परवानगी, आणि मग अपघात
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून अजित आशाताई अनंतराव पवार यांची ओळख आहे. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर आता स्वतः शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शरद पवार म्हणाले, “हा निव्वळ अपघात आहे, यात कुठेही राजकारण नाही. अजित पवारांच्या निधानानं राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारं आहे’. असं ते म्हणाले.
‘दादां’चा 35 वर्षांचा राजकीय प्रवास :
अजित पवरांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील देवळाली-प्रवरा या गावी झाला. मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील असलेल्या त्यांनी बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या पवार कुटुंबात समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले.
पुढे त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी विवाह केला. पार्थ आणि जय ही दोन मुले आहेत. मात्र, त्यांच्या राजकीय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात १९९१ मध्ये झाली. त्यांनी जून १९९१ ते सप्टेंबर १९९१ या अल्प कालावधीसाठी लोकसभा सदस्य म्हणून काम पाहिले.
त्यानंतर त्यांनी राज्य राजकारणावर लक्ष केंद्रित केले आणि १९९१ पासून सलग आजपर्यंत ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. अजित पवारांनी सहा वेळेस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
हे देखील वाचा :
Ajit Pawar : “अजित पवारांनी सुरू केलेल्या कार्याला पुढे चालवून…”; गौतम अदाणींनी व्यक्त केल्या भावना






