Jamkhed News : नान्नज परिसराच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ७ ऑगस्टपासून आमरण उपोषण; शहाजी राजेभोसले यांचा इशारा
Jamkhed News : जामखेड तालुक्यातील प्रमुख व्यापारी व शैक्षणिक केंद्र असलेल्या नान्नज आणि परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित मूलभूत समस्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील प्रमुख व्यापारी व शैक्षणिक केंद्र असलेल्या नान्नज आणि परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित मूलभूत समस्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. (Jamkhed News)
विशेष म्हणजे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार तसेच नान्नजचे स्थानिक रहिवासी असलेले विधानपरिषदेचे आमदार सुनील कर्जतकर या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या उदासीन कारभाराचा निषेध नोंदवण्यात येत आहे. (Jamkhed News)
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी रामचंद्र राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ पासून नान्नज बस स्थानक परिसरात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Jamkhed News)
नान्नज येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस भरत मोहळकर, अंकुश मोहळकर, सचिन मंलगणेर, गणी पठाण, जमील शेख, युनुस पठाण, आदम शेख, भुंजग दळवी, पोपट क्षीरसागर, अजय रजपूत, नितीन पाद्रे, सुरेश मोहळकर आणि अजिनाथ कुमटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. (Jamkhed News)
यावेळी बोलताना शहाजीराजे भोसले यांनी सांगितले की, नान्नज हे सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे महत्त्वाचे गाव असून परिसरातील १२ ते १३ गावे शैक्षणिक, वैद्यकीय व दैनंदिन व्यवहारासाठी नान्नजवर पूर्णपणे अवलंबून आहेत. (Jamkhed News)
मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता, नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे संपूर्ण परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नान्नज येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व आसनव्यवस्था असलेले सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे. (Jamkhed News)
तसेच शेतकरी, लहान व्यापारी, वृद्ध व तरुणांच्या सोयीसाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ किंवा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सारख्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (Jamkhed News)
याशिवाय अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवून तात्काळ डांबरीकरण करावे आणि एसटी बस सेवा पूर्ववत सुरळीत करावी. जलसंधारणाच्या दृष्टीने नदीवरील फुटलेला बंधारा पूर्ववत दुरुस्त करावा, तसेच धोंडपारगाव ते बोलें दरम्यान नांदनी नदीवर आणि गुरेवाडी तलाव ते जवळका रोड ओढ्यावर नवीन बंधारे बांधून उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करावी. (Jamkhed News)
जिओ, एअरटेल व बीएसएनएल कंपन्यांच्या टॉवरची तांत्रिक दुरुस्ती करून कॉल ड्रॉप व नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी. प्रशासनाने या रास्त मागण्यांची वेळेत दखल न घेतल्यास ७ ऑगस्टपासून सुरू होणारे हे आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपात छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. (Jamkhed News)






