Accident News : मोठी दुर्घटना..! एकाच गावातील ८ मित्रांचा मृत्यू; महाराष्ट्राला हादरवणारा अपघात नेमका कसा झाला?
Accident News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे.

Accident News : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एक भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळल्याने एकाच जिल्ह्यातील ८ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. यातील ५ तरुण कोरेगाव तालुक्यातील एकाच गावचे (आसगाव) असल्याने संपूर्ण गावावर आणि सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (Accident News)
मध्यरात्री नेमकं काय घडलं? (Accident News)
ही दुर्घटना मध्यरात्रीनंतर साधारण २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी कार दरीत कोसळताना पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, घाटातील तीव्र वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल दरीत कोसळले. (Accident News)
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कार दरीत पडताना आतून मदतीसाठी आरडाओरड ऐकू येत होती. मात्र दरीची खोली आणि अंधारामुळे तातडीने मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. (Accident News)
मृत तरुणांची नावे (Accident News)
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे देखील समोर आली आहेत. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि संदीप काटकर (वय ३५) या तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. (Accident News)
बचाव पथकांची युद्धपातळीवर मोहीम
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि स्थानिक मदत पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढले. (Accident News)
अपघातामागे रस्ते सुरक्षेचा प्रश्न?
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि मृतांच्या कुटुंबीयांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. घाटातील धोकादायक वळणांवर पुरेसे संरक्षण कठडे नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Accident News)
कुटुंबीयांनी मृतांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Accident News)





