IND vs AUS : “शमीच्या अनुपस्थितीत भारताला….”, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीबाबत रिकी पॉन्टिंगने केली धक्कादायक भविष्यवाणी….

Ricky Ponting Prediction On Border Gavaskar Trophy 2024-25 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जसजशी जवळ येत आहे, तसतशी या मालिकेची चर्चा जोर धरू लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी तज्ज्ञांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही या मालिकेबाबत भाकीत केले आहे. त्यानं मालिकेचा निकाल काय असेल हे सांगतिले आहे. त्याच्या या भाकितामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत कोणते संघ असतील हे सुध्दा स्पष्ट झालं आहे .
दोन्ही देशांदरम्यान 22 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून, त्यातील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत हॅट्ट्रिक साधण्यावर असेल. तथापि, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा दौरा सोपा नसेल कारण त्यांना अलीकडेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 अशा कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय संघातील स्टार फलंदाजांचा फॉर्म हा चिंतेचा मोठा विषय आहे. भारताची अलीकडची कामगिरी पाहता पाँटिंगने ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आणि भारताच्या मोठ्या पराभवाची भविष्यवाणी केली. पाँटिंगच्या मते “ऑस्ट्रेलिया ही पाच सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकेल कारण कसोटी सामन्यात 20 विकेट्स घेणे हे पाहुण्या संघासाठी ‘सर्वात मोठे आव्हान’ असेल.”
पाँटिंगने या गोष्टीवर भर दिला की, “शमी दुखापतींमुळे गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि नवोदित हर्षित राणा यांचा समावेश असलेल्या भारताच्या गोलंदाजीतील आक्रमणात कमतरता दिसून येत आहे त्यामुळे भारतीय गोलंदाजी विभागात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही.”
पुढे पॉन्टिंग म्हणाला की, “मला वाटते की पाच कसोटी सामन्यांमध्ये भारत कुठेतरी एक कसोटी सामना जिंकेल. पण तरीही मला वाटते की भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया कदाचित थोडा अधिक संघटित, थोडा अधिक अनुभवी दिसत आहे आणि आपल्याला माहित आहे की, ऑस्ट्रेलिया संघाला त्याच्यात भूमीवर(मायदेशात) हरवणे खूप कठीण आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया 3-1 ने मालिका जिंकेल या मतावर मी कायम राहिल.”
पॉटिंगच्या भविष्यावाणीनुसार अंतिम फेरीतील संघ झाले निश्चित…
पॉन्टिंगने केलेल्या भाकितामुळे (भविष्यवाणी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला फायनालिस्ट संघही निश्चित झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना टॉप-2 संघांमध्ये खेळला जातो. आता ऑस्ट्रेलिया 62.50 गुणांसह पहिल्या स्थानावर तर भारत 58.33 टक्के गुणांसह दुसरा क्रमांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित 5 पैकी 4 सामने जिंकावे लागतील. त्यातच भारतीय संघाला उर्वरित सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. दुसरीकडे, अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला उर्वरित 7 पैकी 4 कसोटी जिंकाव्या लागतील. ऑस्ट्रेलियाचे 7 सामने बाकी आहेत, संघ भारताविरुद्ध घरच्या मैदानावर 5 सामने आणि श्रीलंकेविरुद्ध 2 सामने श्रीलंकेत खेळणार आहे. आणि पॉन्टिंगच्या मते ऑस्ट्रेलिया 3-1 ने मालिका जिंकेल आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याचे अंतिम स्थान जवळपास निश्चित होईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा एक फायनालिस्ट निश्चित झाला असून दुसरीकडे भारताची वाट बिकट झालेली आहे.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडिया जोरदार पुनरागमन करू शकते – जोश हेझलवूड
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. भारताने 2014-15 पासून सर्व चार मालिका जिंकल्या आहेत, ज्यात 2018-19 आणि 2020-21 मधील ऑस्ट्रेलियातील मालिकांचा समावेश आहे. तथापि, मायदेशात झालेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत भारताला प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे पाहुण्या संघाला पराभूत करण्याची चांगली संधी असल्याचे पाँटिंगचे मत आहे.





