पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित कक्ष व विधी विभाग, पुणे यांचे वतीने सर्वसामान्य पुणेकर नागरीकांना मोफत कायदा सल्ला मिळणेकरीता सुरू केलेल्या “न्यायगड’चे उदघाटन पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. नवी पेठ येथील पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे हा सोहळा झाला. या न्यायगडाचे कामकाज हे प्रत्येक शुक्रवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये मनसे, पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय, नवी पेठ, पुणे या ठिकाणी सुरू राहणार आहे.
पक्षाच्या वतीने दोन विधीज्ञ व जनहित कक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नागरीकांना मोफत कायदेशीर सल्ला देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यांत येणार आहे.
त्यावेळी शहराध्यक्ष वसंत मोरे, मनसे महापालिका गटनेते साईनाथ बाबर, पक्षाचे नेते राजेंद्र (बाबु) वागसकर, अनिल शिदोरे, जनहित कक्ष व विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. किशोर शिंदे, मनसे विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ऍड. अरुण लंबुगोळ, चिटणीस ऍड. समीर ईनामदार, पुणे शहर अध्यक्ष ऍड. सतिश कांबळे, ऍड. जमीर ईनामदार, ऍड.अभिषेक जगताप, तसेंच जनहित कक्षाचे सरचिटणीस जयराज लांडगे, संजय काळे, नरेंद्र तांबोळी हे उपस्थित होते.