वाघोली – वाघोली गावातील समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत, सततच्या पाठपुराव्यानंतर देखील सरकार याबाबत गंभीर नाही. या अनुषंगाने नागपूर विधान भवनाच्या प्रांगणात वाघोलीची ट्रॅफिक समस्या, पाणी समस्या, सांडपाणी समस्या या प्रमुख समस्यांबद्दल सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
वाघोलीमधील वाहतूक कोंडी पिण्याचे पाणी सांडपाणी आदी प्रश्नांबाबत वारंवार लक्षवेधी तसेच शासनाकडे पत्राद्वारे आमदार अशोक पवार यांनी पाठपुरावा केला आहे. आता आमदार पवार यांच्याकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
“वाघोलीमधील पिण्याचे पाणी, सांडपाणी, अंतर्गत रस्ते तसेच वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस विदारक रूप धारण करत असून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.”- राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली.