Prakash Ambedkar: “२२ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची साधी खंतही नाही!” धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar: "पोलिसांच्या अमानुष अत्याचाराचा राजीनाम्यात उल्लेख नाही"; सर्वोच्च न्यायालयही सरकारवर नाराज असल्याचा आंबेडकरांचा दावा.

Prakash Ambedkar – केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. आंदोलनात समाजकंटक घुसतात, असे वक्तव्य राजीनाम्यात केले आहे. त्यांनी २२ जणांनी आत्महत्या केली, याबद्दल कुठलीही खंत व्यक्त केलेली नाही. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही. त्यामुळे आंदोलनाl माघार का घ्यावी. विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल,
असे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (दि. २४) माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. आंबेडकर म्हणाले की, पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा राजीनाम्यात उल्लेख नाही. नुकसानभरपाई देणार, याबाबत स्पष्टता यायला हवी होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकले आहे. जे झुकणार नाही असे म्हणाले, त्यांनी आता नाक रगडवले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवर राग आहे, असे दिसत आहे.
आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि नंतर लाठीचार्जचे व्हिडीओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते, असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याआधी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मोठा इशारा दिला होता. ते म्हणाले की, खासदारांच्या घरावर निदर्शने करून आंदोलनाचे सब सेंटर ते करायले हवे.
त्यांना निवेदन देऊन राजीनाम्यासाठी प्रवृत्त्त करायला हवे. यासाठी त्यांच्या घरावर आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच अभिजीत दीपके यांना मी निरोप पाठवला आहे की, या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये याची काळजी घ्यावी. खासदार शरद पवार यांना या आंदोलनापासून दूर ठेवा. राजकीय पक्ष आणि आंदोलक यांना आराखडा ठरवून द्यावा. त्यानुसार ते आंदोलन करतील.





