– 5 ऑक्टोबरला सलामीचा सामना
– अंतिम लढत 19 नोव्हेंबरला
मुंबई – बीसीसीआयने बुधवारी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबाबत मोठी घोषणा केली. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळालेले असल्याने संपूर्ण देशात त्याचा फिवर राहावा यासाठी यंदा तब्बल 12 शहरांत या स्पर्धेचे सामने होणार आहेत.
सलामीची लढत येत्या 5 ऑक्टोबरला तर अंतिम सामना येत्या 19 नोव्हेंबरला होणार आहे. सलामीच्या सामन्याचे ठीकाण अद्याप जाहिर करण्यात आलेले नसले तरीही अंतिम सामना मात्र, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
स्पर्धेच्या नव्या रचनेनूसार बाद फेरीच्या तिन सामन्यांसह एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे सामने हैदराबाद, कोलकाता, लखनौ, इंदूर, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट, मुंबई व अहमदाबाद येथे खेळवले जातील. 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने भारतातच झालेल्या 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
Women’s World Boxing C’ships : जागतिक मुष्टियुद्धात निखतची घोडदौड
यंदाही चाहत्यांकडून तीच अपेक्षा राहणार आहे. मात्र, गेल्या संपूर्ण दशकात भारतीय संघ आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकू शकलेला नाही. स्पर्धेला तसे पाहायला गेले तर सात महिन्यांचा कालावधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेच निश्चितच विजेतेपद पटकावेल अशी अपेक्षा केली जात आहे.
पुण्याला डावलले
विश्वकरंडक स्पर्धेचे सामना तब्बल 12 शहरांत होणार आहेत, असे बीसीसीआयने जाहिर केल्यावर लगेचच यातील एकही सामना पुण्यात का आयोजित करण्यात आली नाही, असा सवाल चाहत्यांनी केला आहे. पश्चिम विभाग म्हणजे केवळ मुंबई असा अर्थ बीसीसीआय काढते का. महिलांच्या आयपीएल स्पर्धेतील एकही सामना पुण्याला मिळाला नाही उलट सर्व सामने एकाच मुंबईतच खेळवले गेले. यावरून बीसीसीआय पुण्यासाठी सापत्नभाव ठेवत असल्याची टीकाही सोशल मीडियावर केली जात आहे.